Wednesday, November 26, 2014

माझी सहल

या वर्षी माझी सहल फार दूर जाणार होती आणि ती ही ३ दिवसांची. त्यामुळे मला बाबा पाठवतो का नाही ? असा मोठ्ठा प्रश्न माझ्यापुढे पडला होता. पण शेवटी बाबा तयार झालाच. शाळेवाल्यांनी तारिख ठरवली २०-११,२१-११ आणि २२-११ हे तीन दिवस. हे कळल्यावर शाळेत फक्त आणि फक्त ट्रिप, ट्रिप आणि ट्रिप या विषयावरच बोलणी सुरु होती.

२०-११-२०१४ 

अखेर २० तारीख उगवलीच. वेळापत्रकाप्रमाणे निघायचे ठरले. सकाळी ५ वाजताची वेळ सांगितली. आम्ही ५ वाजता गेलो तर सर्व मुले आली होती पण शिक्षक वर्ग आले नव्हते. नंतर हळुहळु यायला सुरवात झाली. बस सुटली बरोबर ६ वाजता. आमची बस होती माउली ट्रॆव्हल्सची.


पहिले अर्धा तास आम्हाला १२ जोतिर्लिंगांची माहिती टि.व्ही. वर दाखवली. पंढरपुर गेल्यानंतर आम्हाला ७ वाजता ’लय भारी’ हा सिनेमा दाखवला. मला तो सिनेमा खरच कंटाळवाणा वाटला. आम्ही ९ वाजुन ४५ मिनीटाला बरोबर येरमाळ्याला होतो. त्यानंतर १०.३० वाजता आम्ही कुंथलगिरीला पोहचलो.





तेथे आम्ही बाहूबलीचे दर्शन घेतले. तेथुन आम्ही १०.४५ ला निघालो. १२ वाजता आम्ही कपिलधा-यात पोहचलो. तेथे मन्मथ स्वामी मंदिर आणि नैसर्गिक धबधबा आम्ही पाहिला.








तेथेच जेवण केले. आम्ही मुले विरुद्ध मुली अशा भेंड्या खेळलो. ४ वाजुन ४५ मिनीटाला आम्ही बरोबर पैठणला पोहचलो. तेथे माहेश्वरी भक्त निवासात सामान ठेवुन आम्ही जायकवाडी धरण पाहायला गेलो.







आणि ७ वाजताच्या म्युझिकल फाउंटनला आम्ही साडे सहा वाजता ज्ञानेश्वर उद्यानात पोहचलो. तेथे थोड्यावेळ खेळलो. म्युझिकल फाउंटन पाहुन झाल्यावर आम्ही परत आलो. त्या दिवशी आमच्या वर्गातल्या श्रुती कुलकर्णीचा वाढदिवस होता. आम्ही तो साजरा केला. सरांनी त्यासाठी केक आणला होता. त्या दिवशी आम्ही खुपच मज्जा केली.




२१-११-२०१४

सकाळी भरभर आंघोळी आटपुन आम्ही दर्शन घेतलं. आणि आम्ही बरोबर आणलेल्या कॆटररनी केलेला इडली-सांबर आम्ही खाल्ला आणि औरंगाबादकडे रवाना झालो. जाता जाता आम्हाला डॊ. प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा अर्धाच दाखवला. औरंगाबादला आम्ही बिबीका मकबरा (ताजमहालची प्रतिकृती) पाहिला. 







आणि पाणचक्की देखिल पाहिली. पाणचक्कीला आम्हाला खरेदीला सोडले. मी आईसाठी एक सुंदरशी पर्स खरेदी केली. आमचं त्यादिवशी ठरल्या प्रमाणे प्राणीसंग्रहालय आणि म्हैसमाळ (महेशमाळ) काही बघणं झालं नाही. परत दुस-या दिवशी ठरलेल दौलताबाद आम्हाला त्याच दिवशी दाखवलं गेलं. दौलताबादला आम्हाला फार वेळ लागला. 









आम्ही १२ वाजता दौलताबाद चढायला सुरवात केली तर आम्ही उतरलो ४ वाजता. उतरल्यानंतर आम्ही जेवण केलं. आणि मी सुद्धा उतरल्यानंतरच पडली त्यामुळे मला खरचटलं. दौलताबाद झाल्यानंतर आम्ही खुलताबादला गेलो. तेथे एका लॊजमध्ये राहण्याची सोय केली होती. खरतरं दोन्ही ठिकाणी राहण्याची सोय स्वच्छ ठिकाणी केली होती. सामान ठेवुन आम्ही घृष्णेश्वर ला गेलो. तेथुन दर्शन घेउन आम्ही परत आलो आणि खूप थकलेलो असल्यामुळे जेवण करुन पटकन झोपलो.


२२-११-२०१४

सकाळी भरभर आटपुन आम्हाला नाश्त्यासाठी वडापाव खायला दिला. आदल्या दिवशी पडल्यामुळे माझ अर्ध लक्ष त्याकडेच होतं.
सकाळी भद्रा मारुतीचं दर्शन घेउन आम्ही परत निघालो. वेरुळची जगप्रसिद्ध कैलास लेणी आम्ही पाहिली. 




ही अशी पहिली वास्तु आहे कि जिला वरुन खालपर्यंत बांधत आणले आहे. यादिवशी आम्ही दत्त देवगडला गेलो. तेथेच जेवण केले व हा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्हाला कॆटररकडुन आईसक्रिम मिळाले. त्यानंतर परत ठरल्याप्रमाणे आमचं नगरचं टॆंक म्युझियम झालच नाही. आम्ही पंढरपुर मार्गे आलो म्हणुन मी सरळ फॆबटेकवरचं उतरली. मी घरी रात्री ११ वाजता पोहचली. कारण कॆटरर घेतल्यामुळे एका हॊटेल समोर थांबवुन त्यांनी तेथे नाश्ता बनवला.
त्यादिवशी घरी आल्यावर मला खरचं छान वाटलं.

No comments:

Post a Comment